ऐतिहासिक निर्णय असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने किरकोळ अन् घाऊक व्यापाऱयांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या कक्षेत सामील केले आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे देशाच्या किरकोळ आणि घाऊक व्यापाऱयांना मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून व्यापाऱयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक ठरविले आहे. दीर्घ काळापासून किरकोळ अन् घाऊक व्यापारी या दर्जाची मागणी करत होते. नव्या निर्णयामुळे 2.5 कोटी व्यापाऱयांना लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने किरकोळ अन् घाऊक व्यापाऱयांना एमएसएमईचा दर्जा देण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे कोटय़वधी व्यापाऱयांना सहजपणे कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. व्यापाऱयांना अनेक अन्य लाभ मिळतील आणि त्यांच्या व्यापाराला बळ मिळणार आहे. देशातील व्यापाऱयांना सशक्त करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे मोदींनी शनिवारी ट्विट करत म्हटले आहे. एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एक ट्विट करत या निर्णयाची घोषणा केली होती.
व्यापारी संघटनांना आनंद
किरकोळ तसेच घाऊक व्यापाराला सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांच्या कक्षेत आणण्याच्या सरकारच्या निर्णयाला उद्योग संघटनांनी ऐतिहासिक ठरवत आनंद व्यक्त केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घाऊक तसेच किरकोळ व्यापारालाही बँका तसेच वित्तीय संस्थांकडून प्राथमिकताप्राप्त शेणीत कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. एमएसएमईला स्वतःचा बचाव, पुन्हा झेप घेण्यासाठी आवश्यक समर्थन मिळू शकेल असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.
उद्यम पोर्टलवर नेंदणी
एमएसएमई अंतर्गत कृषी, एमएसएमई आणि काही अन्य निर्धारित क्षेत्रांना स्वस्त दरांवर आणि प्राथमिकतेच्या आधारावर बँका कर्ज देतात. बँकांना स्वतःच्या एकूण कर्जापैकी एक हिस्सा या क्षेत्रांसाठी राखून ठेवावा लागतो. एमएसएमईच्या कक्षेत सामील झाल्यावर आता किरकोळ अन् घाऊक व्यापारी उद्यम पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतील. एमएसएमई मंत्रालयाच्या उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत व्यापारीच एमएसएमईशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात.