प्रतिनिधी / कुरुंदवाड
राज्य सरकारकडून 1 हजार कोटीची आर्थिक मदत घेतल्यामुळे एसटीला नवसंजीवनी मिळाली असून सहा हजार कोटीचा तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर प्रथमच दत्त दर्शनासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री परब यांनी श्रींच्या चरणी महापूजा व आरती सेवा सादर केली श्रींची प्रतिमा नारळ प्रसाद भेट देऊन दत्त देव संस्थानच्यावतीने अध्यक्ष अशोक पुजारी यांच्या हस्ते मंत्री परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त प्राचार्य गुंडो श्रीपाद पुजारी, विकास पुजारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की सुरुवातीला लॉकडाउनमुळे एसटीकडे पैसे नव्हते त्यावेळी गरज पडल्यास कर्ज काढून कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मात्र यासाठी राज्य सरकारकडून आम्ही एक हजार कोटीची आर्थिक मदत घेतल्याने एसटी कामगारांचा तीन महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देऊ शकलो ती नामुष्की आमच्यावर आली नाही यामुळे एसटीला नव संजीवनी मिळाली आहे. मात्र याचे भांडवल आमचे विरोधक करीत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे.
ते म्हणाले एसटीला सहा हजार कोटीचा तोटा आहे तो भरून करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा सरकारचा रोड मॅप आपण मंत्री झाल्यानंतर तयार केला होता तो राबवण्यात येणार होता तोपर्यंत कोरोनाचे संकट आल्यामुळे त्याची कार्यवाही होऊ शकली नाही. पण आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे यानंतर त्या तयार केलेल्या रोड मैपची कार्यवाही करून एसटीला निश्चित तोट्यातून बाहेर काढणार आहे.
मंत्री परब म्हणाले की एसटीला तोटा होण्यासाठी अवैद्य प्रवासी वाहतूक हे एक प्रमुख कारण आहे मात्र यातूनही मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. यासाठी एसटीची मालवाहतूक सुरु केली आहे. उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या पेट्रोलपंपना बाहेर ही विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे इंधन बचतीचे कार्यक्रम चालू केले आहेत. खाली गाड्या धावत आहेत त्यामुळे मोठे नुकसान होते. टायर रिमोल्डिंग चे काम जे स्वतः एसटी करते ते बाहेर पण करायला परवानगी दिली आहे. सध्या एसटी चालू झाली असती तरी भारमान फार कमी आहे. यामुळे ही तोटा होत असून एसटी तोट्यात आणण्यासाठी जी कारणे आहेत त्यांना लवकरच चाप बसवणार आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश मलमे तसेच धनाजीराव जगदाळे मधुकर गवंडी सागर धनवडे अभिजित जगदाळे एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Articleसातारा : दुचाकी चोरी, दरोडा व अपहरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
Next Article रस्त्याअभावी मातेसह नवजात बालकाला मृत्यूने गाटले
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.