प्रवाश्यांची गैरसोय कायम
प्रतिनिधी/ सातारा
मागील सहा दिवसांपासून एस.टी कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप ही सातारा जिल्हय़ातील सर्व आगारात सुरूच आहे. सातारा जिल्हय़ातील एकुण 11 आगारातील सर्व कर्मचाऱयांनी शनिवारी ही उत्स्फुर्तपणे सहभाग दर्शविला होता. काही आगारात तर कर्मचाऱयांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत या आंदोलनात सहभाग दर्शविला होता. विशेषतः कर्मचाऱयांच्या लहान मुलांनी ही या आंदोलनात सहभाग घेऊन विविध मागण्यांचे फलक हाती घेतलेली ही मुले सर्वांचेच लक्ष वेधेत होती.
त्यामुळे शनिवारी ही एकही बस आगारातुन बाहेर पडली नाही. राज्यातील काही ठिकाणी काही कर्मचारी हे आपापल्या सेवेत रूजु झाले. पण सातारा जिल्हय़ातील सर्वच कर्मचाऱयांनी अद्याप ही आपला पवित्रा कायम ठेवला आहे. जोपर्यंत ‘राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलगीकरण’ ही मागणी मान्य होत नाही तोवर हे आंदोलन मागे न घेण्याचे कर्मचाऱयांच्या वतीने ठरविण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन आशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱयांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
कर्मचाऱयांच्या याआंदोलनाचा सर्वाधिक फटका मात्र प्रवाश्यांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. कारण खासगी वाहन चालकांनी तर प्रवाश्यांची सरळसरळ लुटच सुरू ठेवली आहे. सातारा ते मुंबईचा दर 600 तर पुण्या पर्यंतचा दर 300 रूपयांपर्यंत लावण्यात येत आहे. त्यातच सध्या शाळा-महाविद्यालये ही सुरू आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची ये-जा ही साताऱयात होत असते. ग्रामीण भागातुन येणाऱया विद्यार्थ्यांचे एस.टी बंद असल्याने आतोनात हाल होत आहेत. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना तर दळणवळणाची साधणे अधिक प्रमाणात नसल्याने ठराविक अंतरापर्यंत पायपीट ही करावी लागत आहे.
सातारा जिल्हय़ात महामंडळाचे एकुण 11 आगार आहेत. या आगारातुन दरररोज एक हजार 263 फेऱया सुटतात. त्यातुन एक लाख 52 हजार 588 किलोमीटर अंतराचा प्रवास करून प्रश्यांना सेवा देण्यात येते. याअंतर्गत एका दिवसाचे 46 लाख 29 हजाराचे उत्पन्न मिळते. मागील सहा दिवसात दोन कोटी 77 लाख 74 हजारा इतके परिवहन मंडळाचे जिल्हय़ाचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कर्मचाऱयांच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार घेणे गरजेचे आहे.