रत्नागिरी विभागाने कामगार न्यायालयात दिली होती तक्रार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून एसटी कर्मचाऱयांविरूद्ध दाखल केलेल्या तक्रारीची 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आह़े यावेळी एसटीच्या कर्मचाऱयांकडून संपाबाबत आपली भूमिका न्यायालयात स्पष्ट करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आह़े त्यामुळे आजच्या सुनावणीकडे कामगारांसह एसटीच्या अधिकाऱयांचे लक्ष लागून राहिले आह़े
विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे मागील 2 महिन्यांपासून संपावर आहेत़ यामुळे होत असलेले प्रवाशांचे नुकसान व कामगार नियमांचा भंग यासाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आपल्या 56 कर्मचारी व 6 कर्मचारी संघटना यांच्याविरूद्ध कामगार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होत़ी या तक्रारीमध्ये हा संप बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आह़े राज्यभरात अशा प्रकारे विविध जिह्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही एसटीकडून देण्यात आली. एसटीच्यावतीने रत्नागिरीतील ऍड. एस़ एम. देसाई हे खटल्याचे कामकाज पाहणार आहेत़
जिह्यामध्ये रविवारीही एसटीच्या 350 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 562 कर्मचारी हजर झाले आहेत़ तर 267 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचाही समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 136 प्रशासकीय, 205 कार्यशाळा, 86 चालक, 70 वाहक, 65 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. दरम्यान एसटीच्या दरदिवशी चालणाऱया फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े रविवारी एकूण 26 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े