वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक यांनी येत्या 30 जूनपर्यंत एटीएम सेवा विनाशुल्क राहणार असल्याचे सांगितले आहे. एसबीआयने ही माहिती ट्विटवरुन दिली आहे. या अगोदर 24 मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएम सेवांवर शुल्क न आकारण्याची घोषणा केली होती. याच बाबतचा निर्णय घेत एसबीआयने स्टेट बँक आणि अन्य बँकांमधील एटीएमच्या व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँकेतून किंवा इतर बँकेच्या एटीएममधून वारंवार पैसे काढावे लागले तरी त्यावर शुल्क आकारले जाणार नाही. तीन महिन्यापर्यंत बँक मिनीमम बॅलेन्सवर शुल्क घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले