दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी हाहाकार- देशभर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर
देशभर कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे अभूतपूर्व संकट निर्माण झाल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्यामुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पिटल, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, औषधे आणि हॉस्पिटलमधील बेडचा तुडवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी देशभर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. न्यायव्यवस्थेने याबाबत चिंता व्यक्त करत सरकारला या आव्हानात्मक स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचा ‘डोस’ दिला आहे.
दिल्लीत आणखी 20 रुग्णांचा मृत्यू
देशातील कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केले असून ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे. दिल्लीतील ‘जयपूर गोल्डन’ रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने 20 रुग्णांचा तर अमृतसरमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जयपूर गोल्डन रुग्णालयातील प्रशासनाच्या माहितीप्रमाणे, रुग्णालयातील आयसीयूमधील ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण गंभीर स्थितीत होते. अजूनही ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे आणखी काही गंभीर रुग्णांचा जीव धोक्मयात आला आहे.
‘जयपूर गोल्डन’ हॉस्पिटलमध्ये अजूनही 215 कोरोना रुग्ण उपचार घेत असून त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे. मृत्यू पावलेल्या सर्व रुग्णांची स्थिती गंभीर होती. या घटनेपाठोपाठ शनिवारी सकाळपासून दिल्लीतील अनेक हॉस्पिटलनी ऑक्सिजनच्या तुटवडय़ासंदर्भातील इमर्जन्सी संदेश जाहीर केला आहे. ऑक्सिजनअभावी काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत असून नवीन रुग्णांना दाखल करून घेणे बंद करण्यात आले आहे. हॉस्पिटलकडून यासंबंधी एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये बऱयाच प्रयत्नाअंतीदेखील ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने हॉस्पिटलमधील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
अमृतसरमध्ये सहा जणांचा मृत्यू
पंजाबच्या अमृतसरमध्ये निळकंठ नावाच्या एका खासगी रुग्णालयामध्ये सहा रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाच रुग्ण हे कोरोनाचे होते. हॉस्पिटलने ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रमाणात केला नसल्यामुळे रुग्णांचा जीव गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय खासगी असल्याने आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्यामुळे या रुग्णांचा जीव गेला असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
पुरवठा रोखणाऱयांना फाशीच द्यायला हवी!
दिल्ली उच्च न्यायालयाचा सज्जड दम- केंद्र सरकारवरही ओढले ताशेरे
कोरोना रुग्णांसाठी होणाऱया ऑक्सिजनच्या टंचाईवर दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. देशात कोरोनाची त्सुनामी आली असताना आणि कित्येक रुग्ण प्राणवायूअभावी तडफडत असताना स्थानिक प्रशासन किंवा अधिकारी ऑक्सिजन पुरवठा थांबवत असेल तर त्याला फासावर लटकवायला हवे, असा सज्जड दम न्यायालयाने दिला आहे. याप्रश्नी राज्य आणि केंद्र सरकारसह स्थानिक प्रशासनालाही न्यायमूर्तींनी खडे बोल सुनावले आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून राजधानी दिल्लीतील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आाŸक्सिजनच्या तुटवडय़ामुळे रुग्णालये हतबल झाली असून, ऑक्सिजनच्या पुरवठय़ासाठी केंद्र आणि राज्य सरकारला विनवण्या करून थकल्यानंतर अनेक रुग्णालयांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकांवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर शब्दात सर्वांनाच फैलावर घेतले आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडथळा आणणाऱयांना पाठीशी घालणार नाही, असे सांगत न्यायालयाने सज्जड दम भरला. दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटल, जयपूर गोल्डन हॉस्पिटल, बात्रा हॉस्पिटल आणि सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी हे भाष्य केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपीन संघी आणि रेखा पल्ली यांच्या खंठपीठासमोर शनिवारी सुनावणी झाली. खंडपीठासमोर झालेल्या विशेष सुनावणीत न्यायालयाने दिल्लीतील विविध रुग्णालयात जाणवत असलेल्या तुटवडय़ावरून संताप व्यक्त केला. या महामारीमुळे होणाऱया मृत्यूचा दर कमी आहे. ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, शेवटी त्यांचा मृत्यू होईलच. पण, समस्या ही आहे की, ज्यांचे प्राण वाचवणे शक्मय आहे ते लोकही मरण पावत आहे. मृत्यूदर कमी करण्याची गरज आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
केंद्र सरकारलाही सुनावले
न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारला देखील ऑक्सिजन पुरवठय़ावर जाब विचारला आहे. सध्याची परिस्थिती पाहता गरज पडल्यास रुग्णालयांना संरक्षण द्या, असे सांगत ‘प्रिय’ व्यक्ती गमावल्यानंतर लोकांच्या काय भावना असतात याची न्यायालयाला जाणीव आहे असे खंडपीठाने म्हटले आहे. तसेच दिल्लीला दररोज 480 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचा निर्णय अंमलात कधी येईल? असा प्रश्नही विचारला आहे. 21 एप्रिल रोजीच आपण हे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे, दिल्ली सरकारला आश्वासने देऊन सुद्धा केंद्राकडून रोज केवळ 380 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारी केवळ 300 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला, असा दावा करण्यात आला.
ऑक्सिजन संबंधित वस्तूंवरील आयात शुल्क माफ
देशातील कोरोना संकटात ऑक्सिजनच्या तुटवडय़ाला दूर करण्यासाठी सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी ऑक्सिजन आयातीवरील बेसिक कस्टम डय़ुटी म्हणजे आयात शुल्क आणि हेल्थ सेस पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्क माफ करण्याची घोषणा ऑक्सिजनशी निगडीत उपकरणांवरदेखील लागू आहे. या निर्णयाला तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे. कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधान मोदी यांचे मुख्य सचिव आणि इतर अनेक वरि÷ अधिकारी उपस्थित होते. देशात वैद्यकीय ऑक्सिजनची तात्काळ गरज आहे. सर्व विभागांनी एकमेकांशी ताळमेळ साधत काम करावे आणि देशातील ऑक्सिजनचे संकट लवकरात लवकर संपवावे असे पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत सांगितले. या निर्णयामुळे देशातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्याबरोबरच किंमतीही नियंत्रणात येतील, असा दावा करण्यात आला आहे.