विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : परीक्षाही रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ऑनलाईन शिक्षण! मग फी का आकारली जाते? सरकारी कर्मचाऱयांना पूर्ण वेतन दिले जाते, इतरांना का नाही? फी आकारली जात असेल तर शिक्षण दिले पाहिजे, शिक्षण दिले नाही तर वेतनही निम्मे करा, अशी मागणी ऑल इंडिया डेमोक्रॅटीक स्टुडन्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले.
सरकारने परीक्षा घेऊ नये, असे सांगितले. मात्र आरसीयु परीक्षा घेण्याबाबत अट्टहास का करत आहे, सरकारने जे नोटीफिकेशन दिले आहे त्याची अंमलबजावणी विद्यापीठाने केली पाहिजे. मात्र ते करण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून फी आकारली जात आहे, हे योग्य नाही. दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी पूर आला, त्या पुरातून महाविद्यालयाला येऊन परीक्षा देणे कठीण आहे. खानापूरसारख्या दुर्गम भागातून विद्यार्थी येतात. त्यांना महाविद्यालयाकडे येणे अशक्मय आहे. तेंव्हा परीक्षा रद्दच कराव्यात, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.
डिप्लोमा तसेच इतर पदवी परीक्षा पूर्णपणे रद्द कराव्यात. राज्य सरकारने असा आदेशदेखील काढला आहे. त्याची अंमलबजावणी करावी. फी दिल्याशिवाय हॉलतिकीट दिले जाणार नाही, असे कॉलेजचे प्रशासन सांगत आहे. कोरोना असल्यामुळे पालकांना कामच नाही तर फी कोठून भरणार? तेंव्हा परीक्षाच रद्द कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राजू गाणगी, नागराज हेगडे, सूरज आवळे, वैभव सुतार, विनायक केळगेरी यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.