प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील ओढ्यावरील श्री रेणकादेवी तथा यल्लमादेवीच्या प्रसिद्ध मंदिरात दरवर्षी डिसेंबरमध्ये सौंदत्ती यात्रेनंतर होणारी अंबील यात्रा या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जोगती पुजारी व रेणुका मंदिर यात्रा कमिटीने हा निर्णय घेतला. ही माहिती यात्रा कमिटीच्या मदन आई शांताबाई जाधव यांनी एका पत्रकाव्दारे दिली. दरम्यान, अंबील यात्रा होणार नसली तरी रेणुकादेवीच्या भाविकांना नैवेद्य देता यावेत यासाठी एक कुटुंब-एक नैवेद्य हा उपक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय यात्रा कमिटीने घेतला असून गर्दी टाळत सोयीनुसार भाविकांना 30 जानेवारी 2022 पर्यंत नैवेद्य रेणुकादेवीला अर्पण करता येणार आहेत.
ओढ्यावरील रेणकादेवीच्या मंदिरात दरवर्षी डिसेंबरमध्ये अंबील यात्रा होते. सौंदत्ती येथील यात्रेनंतर (पौर्णिमा) होणाऱया अंबील यात्रेकडे कोल्हापूर शहरासह जिल्हÎातील भाविकांची ओढ लागलेली असते. गतवर्षी कोरोनामुळे अंबील यात्रा रद्द केली होती. यंदाही जिल्हा प्रशासनाने केलेले नियम आणि पोलीस प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे यात्रा कमिटीने अंबील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जोगती पुजारी मदन आई शांताबाई जाधव यांनी दिली.
जाधव यांनी सांगितले की ः प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांच्या सुरक्षेसाठी अंबील यात्रा रद्द केली आहे. मात्र 18 डिसेंबरला पौर्णिमेदिवशी रेणुका मंदिरात होणार कंकण विमोचन सोहळा निवडक पुजारी, जोगती यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे भाविकांनी या सोहळÎावेळी मंदिरात गर्दी करू नये. गर्दी करणाऱयांवर कारवाई संदर्भात पोलीस प्रशासनाने इशाराही दिला आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, असेही जाधव यांनी सांगितले.