वार्ताहर/ औंध
औंध येथील ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार अर्चना पाटील यांनी बैठक घेऊन सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे,सागर जगदाळे, इलियाज पटवेकरी, संतोष भोसले मंडलाधिकारी जी.आर.कुलकर्णी
तलाठी निनाद जाधव ,धनंजय तडवळेकर, निलेश खैरमोडे ,ग्रामस्थ यांच्याशी कोरोना पार्श्वभूमीवर कोणकोणत्या उपाय योजना केल्या आहेत व करणे गरजेचे आहे याविषयी चर्चा केली त्यानंतर औंध गावातील किराणा दुकानांना अचानक भेट देऊन ग्राहक ,दुकानदारांशी चर्चा केली तसेच किराणा दुकानदारांना योग्य दरात किराणा साहित्य विकण्याच्या सूचना केल्या व किराणा साहित्या बरोबरच अन्य जीवनावश्यक साहित्य ज्यादा दराने विकल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी ग्रामस्थांनी सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य उपलब्ध करण्याची मागणी केली तसेच औंध येथील खाजगी वैद्यकीय दवाखान्यांमधुन नियमित योग्य ती सेवा चोवीस तास उपलब्ध करण्याची मागणी केली . यावेळी शासनाकडे वरील मागण्यांचा पाठपुरावा करू तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना योग्य त्या सूचना दिल्या जातील अशी माहिती ही तहसीलदार डॉ. पाटील यांनी दिली. दरम्यान तहसीलदारांनी अचानक भेट देऊन किराणा दुकानांची पाहणी केल्याने ग्राहक, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर दुकानदार ,ग्राहक यांच्या ही अडचणी समजून घेतल्या.