दोन गायी-म्हैस जखमी : शेतकऱयाचे 50 हजाराचे नुकसान
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील नेताजी गल्लीमधील जनावरांच्या गोठय़ाला रात्री अचानक आग लागून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. शेजाऱयांच्या सावधगिरीमुळे पुढील अनर्थ टळला. यामध्ये गोठय़ातील दोन गायी व एक म्हैस अशी तीन जनावरे भाजली आहेत. तर घरमालक राजू ओमाण्णा जाधव जनावरांना बाहेर काढण्यासाठी गोठय़ामध्ये गेले असता आगीच्या ज्वालांमुळे त्यांच्या तोंडाला व अंगाला भाजले आहे. परंतु शेजाऱयांच्या सावधगिरीमुळेच पुढील अनर्थ टळला, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
नेताजी गल्लीमधील राजू ओमाण्णा जाधव यांच्या राहत्या घराला लागून जनावरांचा गोठा आहे. रात्री जनावरांचे दूध वगैरे काढून चारा घालून सर्वजण झोपी गेले होते. रात्री 12 च्या सुमारास त्यांच्या गोठय़ातून आगीच्या ज्वाला येत असल्याचे शेजारी गुंडू जाधव यांनी पाहून राजू जाधवच्या कुटुंबीयांना उठविले. बंद गोठय़ामध्ये तीन जनावरे घाबरून हंबरडा फोडत होती. लागलीच राजू यांनी गोठय़ाचा दरवाजा काढून आत प्रवेश करून जनावरांच्या बांधलेल्या दोऱया कापून जनावरांना बाहेर काढले. यामध्ये दोन गायी, एक म्हैस व राजू जाधव यांनासुद्धा भाजले आहे. यामध्ये गोठय़ाचे छत व जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले.
शेजाऱयांचे प्रसंगावधान
आग लागल्याचे त्यांचे शेजारी गुंडू जाधव यांनी पाहून लगेच सर्वांना उठवून सावधगिरी बाळगून जनावरांच्या दोऱया कापून बाहेर काढले. आणखी थोडा वेळ जरी कुणाचे लक्ष गेले नसते तर तीन जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जाधव यांचे मोठे नुकसान झाले असते. परंतु गुंडू जाधव यांच्या सावधगिरीमुळेच तीन जनावरांचे जीव वाचले, अशी चर्चा सुरू होती.
ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे व तलाठी सुरेश शिंत्रे यांनी घटनेचा पंचनामा केला. जाधव कुटुंबीयाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाने मंजूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.