ऑनलाईन टीम / बीजिंग :
लडाखमधील कडाक्याच्या थंडीने चिनी सैन्य गारठले असून, चीनने भारतीय सीमेपासून 200 किलोमीटरच्या भागातील जवळपास 10 हजार सैन्य मागे घेतले आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
भारत-चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यापासून कडाक्याची थंडी पसरली आहे. लडाखमधील थंडी पाहता चिनी सैन्य आजवर अशा प्रकारच्या थंडीत तग धरु शकले नाही. त्यामुळे चिनी सैन्य वारंवार आजारी पडत आहे. अनेकांना आजारी पडल्यानंतर कमी उंचीच्या भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र, पँगाँग झीलच्या उत्तर किनाऱ्यावर चीनने आपल्या अनेक सैनिकांना गमावले आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असूनही भारतीय जवान जीवाची पर्वा न करता सीमारेषेवर कडक पहारा देत आहेत.