शिवाजी सुंठकर यांनी घेतली परिवहन नियंत्रकांची भेट : बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे विविध भागातील बसफेऱया रद्द करण्यात आल्या होत्या. पण सध्या महाविद्यालये व व्यवहार सुरळीत होऊनही कणबर्गी परिसरातील बसफेऱया सुरू करण्यात आल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसफेऱया सुरळीत करण्याच्या मागणीसाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह ग्रामस्थांनी परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक एम. आर. मुंजी यांची भेट घेतली.
कोरोना विषाणूंचा प्रसार कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. शाळा-महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. मात्र, परिवहन मंडळाकडून अद्यापही बससेवा सुरळीत करण्यात आली नाही. लॉकडाऊनपूर्वी कणबर्गी परिसरात दोन बस नियमित बसफेऱया करीत होत्या. त्यामुळे बस प्रवासी आणि विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण भासत नव्हती. मात्र, लॉकडाऊन काळात बसफेऱया रद्द करण्यात आल्या होत्या. त्या अद्यापही सुरळीत करण्यात आल्या नाहीत. बससेवा सुरळीत करावी अशी मागणी विभागीय नियंत्रक एम. आर. मुंजी यांच्याकडे करण्यात आली. सकाळी आणि सायंकाळच्या कालावधीत बसफेऱया वाढविण्याची गरज आहे. लांब पल्ल्याच्या बसदेखील कणबर्गी बसथांब्यावर थांबविण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे सदर बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन एम. आर. मुंजी यांनी दिले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, निंगाप्पा जाधव, किसन सुंठकर, प्रकाश मुचंडीकर, बाळू किल्लेकर, कार्तिक धामणेकर, सुमित सुंठकर, ईश्वर मालाई, परशराम मालाई, बाबू अष्टेकर, दीपक घुगरेट्टी यांच्यासह कणबर्गी परिसरातील नागरिक उपस्थित होते.