दैव बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावले : सरकार, अधिकाऱयांचे काराभाराकडे दुर्लक्ष नादुरुस्त, इंधन नसलेल्या बस रस्त्यावर
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारचा सेवा उपक्रम असलेली आणि जनतेला योग्य दरात सेवा देणारी कदंब परिवहन महामंडळाची अवस्था बिकट झाल्याचा पुरावा बसगाडय़ाच देत असून ती सेवा बेभरवशाची बनली आहे. कदंब महामंडळाकडे सरकारचे, अध्यक्षांचे गांभीर्याने लक्ष नाही. उलट दुर्लक्षच होत आहे हेच गेल्या आठवडय़ातील काही उदाहरणांवरून सिध्द झाले आहे. सलग तीन दिवस कदंबच्या बसेस वेगवेगळ्या तीन कारणामुळे जागेवरच बंद पडल्या आणि महामंडळाच्या सेवा खंडित पडण्याची ‘हॅट्ट्रिक’ झाली असून त्यात प्रवाशांची जिवितहानी झाली नाही हेच सुदैव म्हणावे लागेल.
शुक्रवार दि. 6 मे रोजी फ्ढाsंडा-केरी मार्गावर गेलेली कदंब बस सावईवेरे बाजारात डिझेल संपल्यामुळे मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शनिवार दि. 7 मे रोजी बदामी कर्नाटक येथून गोव्यात येत असलेल्या कदंब बसचे मध्येच टायरच सुटले. रविवार दि. 8 मे रोजी फ्ढाsंडा सावईवेरे कदंब बसचा ब्रेक निकामी झाला. हे सर्व प्रकार म्हणजे कदंब बससेवा बेभरवशची बनली असून कदंब महामंडळात ‘बेबंदशाही’ माजली असल्याचे दर्शवतात.
कामचुकार कर्मचारी, अधिकाऱयांकडे दुर्लक्ष
सरकारच्या कोटय़वधी रुपयांच्या अनुदानावर हे महामंडळ तग धरून आहे. ते कधी नफ्यात आलेच नाही. ते सातत्याने तोटय़ातच असून दरवर्षी त्याचा तोटा वाढतच आहे. कर्मचाऱयांवर अधिकाऱयांचे लक्ष नाही. बसची तपासणी न होताच त्या मार्गावर पाठवल्या जातात आणि मग बंद पडल्या की फ्ढक्त कारवाईच्या घोषणा होतात. प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई होत नाही. आजपर्यंत कदंब महामंडळातील कामचुकार कर्मचारी, कामगार किंवा अधिकारी यांच्यावर कधीच कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.
कदंबवर संचालक मंडळे येतात आणि जातात…
राज्यात नवे सरकार आले की कदंबसाठी नवे संचालक मंडळ येते आणि सत्ता गेली की ते जाते. सुरुवातीच्या काळात कदंबचा कारभार सुधारुन जनतेला चांगली सेवा देण्याच्या घोषणा केल्या जातात, मात्र पुढे काही विशेष होत नसल्याचे सारा गोवा पाहत आला आहे. प्रत्यक्षात कोणते संचालक मंडळ कदंबचा कारभार सुधारु शकलेले नाही, हेच प्रवासीवर्ग अनुभवत आहे. नादुरुस्त असणाऱया, इंधन नसणाऱया बसगाडय़ा रस्त्यांवर पाठवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱयांवर लक्ष कोणी ठेवायचे? अशा संतापजनक प्रतिक्रिया प्रवासीवर्गाकडून विशेषतः कामगारवर्ग व विद्यार्थीवर्गाकडून व्यक्त होत आहेत.
ग्रामीण भागातील प्रवाशांचे होतायत हाल
इब्रामपूर ते पणजी व्हाया डिचोली, सांखळी, वाळपई कदंबच्या अनियमित सेवेमुळे विद्यार्थ्यांचे तसेच कर्मचाऱयांचे हाल होत आहेत. एक दिवस आल्यानंतर दोन ते तीन दिवस ही कदंब बस गायब होत असते. नियमित प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. इब्रामपूर ते पणजी व्हाया वाळपई ही कदंब सेवा अत्यंत गरजेची असून कोणत्याही परिस्थिती या मार्गावरील कदंब बंद ठेऊ नये अशी मागणी प्रवाशांकडून होत असली तरीही कदंब प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल त्या भागात संताप व्यक्त होत आहे.