प्रतिनिधी/ सातारा
लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करून गाजावाजा करत सुरू केलेले कमानी हौद येथील रंगीत कारंजे काही महिन्यातच बंद पडले. नगरपालिके तर्फे जवळपास 19 लाख रूपयांचा निधी खर्च करून हे कारंजे सुरू करण्यात आले होते. यामुळे साताऱयाच्या वैभवात ही भर पडत होती. पण पुन्ही काही दिवसातच हे कारंजे बंद पडले. त्यामुळे कमानी हौदाला गतवैभव मिळणार का? असा सवाल ही सातारकरांकडुन करण्यात येत आहे.
याबाबत यापुर्वी विचारणा केली असता कोरोना आणि लॉकडाऊनच्या निमित्ताने कारंजे बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत होते. पण आत्ता लॉकडाऊन ही खुले करण्यात आले असुन सर्वत्र पुर्वरत परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही हे कारंजे अद्याप बंदच आहेत. अनेक वर्षांपासुन बंद असलेले हे कारंजे मागील वर्षभरा पुर्वीच सुरू करण्यात आले होते. यावेळी येथे अनेक वर्षांपासुन साठलेला गाळ काढून हे कारंजे पुर्नजिवित करण्यात आले. पण पुन्हा काही दिवसानंतर हे कारंजे बंद ठेवण्यात आले ते आजतागायत बंद स्वरूपातच आहेत.
त्यातच येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेंच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जो-तो नवनवीन कामांच्या शुभारंभामध्ये गुंतला आहे. नुतन कामांच्या शुभारंभाचा धडका लावण्यापुर्वी प्राचीण वस्तुंचे, ऐतिहासीक वस्तुंचे जतन आणि सुशोभिकरण करणे याकडे दुर्लक्ष न करता त्यांचे जतन करावे. त्यामुळे लवकरात लवकर येथील रंगीबेरंगी कारंजे पुन्हा सुरू करण्यात यावेत अशी मागनी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.