वनधिकारी-स्थानिक वाद चिघळण्याची शक्मयता म्हादई अभयारण्य अधिकारी-स्थानिक मारामारी प्रकरण.
प्रतिनिधी / वाळपई
12 मे रोजी सत्तरी तालुक्मयातील करंजाळे याठिकाणी म्हादई अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांच्यात व स्थानिकांमध्ये झालेल्या झटापटीवेळी नारायण देसाई यांना मारहाण झाल्याच्या कारणाखाली करंझोळ, कुमठोळ व बंदीरवाडा भागातील एकूण 54 जणांवर वाळपईच्या पोलीस स्थानकावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता स्थानिक व अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या दरम्यान वातावरण तापण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. यामुळे येणाऱया काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता असून सरकारच्या कृतीबद्दल या तिन्ही गावातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.
याबाबतची माहिती अशी की 12 मे रोजी म्हादई अभयारण्य परिक्षेत्र अधिकारी नारायण प्रभुदेसाई व त्यांच्या वरि÷ अधिकारी तेजस्विता व इतर कर्मचाऱयांसोबत एक पथक कृष्णापुरच्या दिशेने जात होते. यावेळी बंदीरवाडा याठिकाणी एक ज्ये÷ महिला आपल्या घराची शाकारणी करीत होती. यावेळी वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई व सदर ज्ये÷ महिले दरम्यान काही प्रमाणात बाचाबाची झाली. यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी बंदिरवाडा याठिकाणी वनाधिकारी नारायण प्रभुदेसाई व इतरांची वाहने रोखून धरून यासंदर्भात जाब विचारण्यात आला होता. याचवेळी नारायण प्रभुदेसाई यांनी आपणास मारहाण झाल्याची तक्रार स्वतः पोलीस स्थानकावर दाखल केली होती.
वन अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल नाही
दरम्यान, नारायण प्रभुदेसाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन वाळपई पोलिसांनी तीनही गावातील एकूण 54 जणावर गुन्हे दाखल केले आहेत. सरकारी अधिकाऱयाला त्याच्या कर्तव्यापासून रोखून धरणे व त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे अशाप्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे, मात्र ज्ये÷ महिलेने दाखल केलेली तक्रार यासंदर्भात वन अधिकारी यांच्यावर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यामुळे सध्यातरी सदर भागामध्ये संतापाची लाट पसरली असून डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार अधिकारीवर्गाच्या संरक्षणासाठी की सर्व सामान्य जनतेच्या सहकार्यासाठी अशाप्रकारचा सवाल सध्यातरी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे .नारायण प्रभुदेसाई यांच्यावर कारवाई करावी अन्यथा वाळपई पोलिस स्थानकावर मोठय़ा प्रमाणात मोर्चा काढण्याचा इशारा सदर भागातील नागरिकांनी सरकारला दिला होता,मात्र ऐनवेळी सदर मोर्चा का रद्द करण्यात आला या संदर्भाची वाच्यता अजूनपर्यंत झालेली नाही. सरकारने अजूनपर्यंत वनधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी स्थानिकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करणे व हवेत गोळीबार करून जमावाला चिथावण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर असताना अजूनपर्यंत त्यांची नोंद न करणे यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष खदखदताना दिसत आहे. एकूण दाखल केलेल्या गुन्हय़ाच्या संदर्भात स्थानिक आता कोणता निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे. मात्र स्थानिक व अभयारण्याचे व्यवस्थापन यांच्यामधील निर्माण झालेला संघर्ष विकोपाला जाण्याची आहे.