बेंगळूर/प्रतिनिधी
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आत्महत्यांविषयी ताज्या आकडेवारीनुसार दक्षिणेकडील राज्यांमधील गरीब आणि जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर राज्यांमधील लोकांपेक्षा आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे.
एनसीआरबीने जाहीर केलेल्या २०१९ च्या अपघाती मृत्यू आणि आत्महत्याच्या आकडेवारीनुसार आत्महत्या करण्याचे प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि तमिळनाडू पहिल्या दहामध्ये आहेत.
संपूर्ण भारतात आत्महत्यांचे प्रमाण १०.४ टक्के आहे, तर केरळमधील आत्महत्यांचे प्रमाण २४.३, तेलंगणामध्ये २०.६, तामिळनाडूमध्ये १७.८ आणि कर्नाटकमध्ये १७.१ टक्केआहे, अशी माहिती पुढे आली आहे. आत्महत्या करणार्यांपैकी बहुतेक लोक गरीब, लग्न झाले होते. परंतु कौटुंबिक समस्या आणि आजारपण अशा प्रकारच्या कारणांनी त्यांनी आत्महत्या केली आहे.