म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी बुधवारी सांगितले की खरीप हंगामासाठी बियाणे किंवा खतांचा अभाव नाही. दरम्यान, कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी शेतीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १४ जिल्ह्यांचा दौरा केला. दौऱ्यानंतर पाटील यांनी म्हैसूरमधील पत्रकारांना बोलताना, खरीप हंगामासाठी बियाणे किंवा खतांची कमतरता नसल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रश्नांशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे ते म्हणाले. कृषिमंत्री पाटील म्हणाले की, सरकारने १४ प्रकारच्या पिकांच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत.