बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो हेक्तर शेती पाण्याखाली घेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक पथक कर्नाटकात येणार आहे.
याविषयी महसूलमंत्री आर. अशोक यांनी केंद्र सरकारची सहा सदस्यांची टीम ७ सप्टेंबरपासून कर्नाटकातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
के. व्ही. प्रताप यांच्या नेतृत्वाखालील पथक ७ सप्टेंबरला बेंगळूर येथे दाखल होईल आणि राज्यातील पूर परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरापा यांना भेटेल.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी हे पथक तीन दिवसांचा दौराकरणार आहे. हे पथककोडगू, बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांचा दौरा करेल आणि ९ सप्टेंबरला बेंगळूरला परत जातील, असं मंत्री अशोक म्हणाले. सरकार केंद्रीय मूल्यांकन पथकाला निवेदन देईल. महसूलमंत्र्यांनी आतापर्यंत दहा पूर बाधित जिल्ह्यांना भेट दिली होती. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासमवेत या जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षणही केले होते, असेही त्यांनी सांगितले.