बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी आज मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली.
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी एक हजार कोटी रुपये ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.