बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात बुधवारी ५०१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यातून ६६५ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,३३,५७८ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,१३,६७७ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातू घरी परतले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १२,१८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ७,६९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी २६० नवीन बाधितांची भर पडली.