ऑनलाईन टीम/तरुण भारत
गोवा काँग्रेसचे थिवी गटाचे नेते उदय साळकर यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पार्टीचे गोवा डेस्क प्रभारी आतिशी, आप पणजीचे उमेदवार वाल्मिकी नाईक आणि आपचे मुख्यमंत्री उमेदवार अॅड. अमित पालेकर यावेळी उपस्थिती होते.
“उद्योजक उदय साळकर हे कोकणी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत आणि ते लोकप्रिय नाटक कलाकार आहेत. बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात ‘आप’ला राज्यातील लोकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक पक्षात सामील होत आहेत अस प्रसारमाध्यमांशी बोलताना पालेकर म्हणाले.
“भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी २४ तास लागतील. फक्त शिस्त पाहिजे. गोव्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे, पण मी तुम्हाला खात्री देतो, सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी २४ तास लागतील. ते साध्य करण्याची खात्री आहे आणि आम्ही ते करू”, अस उदय साळकर म्हणाले, “काँग्रेस पक्षाने थिवी मध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी माझा वापर केला. दोन वर्षांपूर्वी म्हापसा येथे काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. मी काँग्रेससाठी खूप काम केले आणि त्यांनी माझा विश्वासघात केला” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही ‘आप’ची स्थापना केली. आम्हाला गोवेकरांना एक चांगला पर्याय द्यायचा होता. निवडणुकीच्या तोंडावर इतर सर्व राजकीय पक्ष युती करण्याबाबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. त्याउलट, आप ने आपले 31 उमेदवार, 13 गुणांसह गोव्याचा व्हिजन प्लॅन आणि गोवेकरांनी समर्थन दिलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणून घोषित केला आहे. ‘आप’ला गोवेकरांडून मोठा पाठिंबा मिळत आहे कारण तो सर्वच बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.” अस वाल्मिकी नाईक म्हणाले.
“आम्ही उदय साळकर यांचे पक्षात स्वागत करतो. राज्यासाठीच्या ‘आप’च्या योजनांमुळे प्रभावित होऊन, कॉंग्रेस थिवि ब्लॉकचे नेते उदय साळकर ‘आप’मध्ये सामील झाले. अरविंद केजरीवाल यांचे मोडेल गोव्यात हवे आहे , मोफत वीज ,पाणीपुरवठा, चांगले रस्ते आणि गोव्यातील लोकांनाही रोजगाराच्या संधी हव्या आहेत अस दिल्लीचे आमदार आणि गोवा डेस्क प्रभारी आतिशी म्हणाल्या.
“आपच्या मुख्यमंत्री चेहऱ्याच्या घोषणेने राज्यात सकारात्मकतेची लाट पसरली आहे. येत्या काही दिवसांत अनेक लोक आपमध्ये सामील होतील अस त्या पुढे म्हणाल्या.
उदय साळकर म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सहा वर्षांत दिल्लीच्या शैक्षणिक आणि आरोग्य पायाभूत सुविधांचा कायापालट केला आहे. मी गोवेकरांना आवाहन करतो की त्यांनी आप ला मतदान करावे आणि या बदलाचे साक्षीदार व्हावे”.