संघाच्या भाजपला कानपिचक्या
पटना / वृत्तसंस्था
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसची युती तुटली आहे. आता राजदसोबत कधीही युती होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्व 40 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा काँग्रेसचे बिहार राज्य प्रभारी भक्त चरणदास यांनी केली. राजदने महागठबंधन धर्माचे पालन केले नाही, त्यामुळे काँग्रेस पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदीने लढत आहे. आमचे सर्व नेते बिहारमध्ये पोहोचले असून जोरदार प्रचार करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, याप्रसंगी काँग्रेसने तेजस्वी यादव यांच्यावर काही आरोप केल्यानंतर राजदच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे विसंगत असल्याचा दावा राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी प्रत्युत्तर देताना केला. सध्या बिहारमधील तारापूर आणि कुशेश्वरस्थान या दोन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. राजदने दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यानंतर काँग्रेसने दोन्ही जागांवर आपले उमेदवारही दिले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुशेश्वरस्थानमधील एक जागा लढवली होती.