ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या कांदिवली पश्चिममधील एकता नगरमध्ये सार्वजनिक शौचालय साफ करण्यासाठी गेलेल्या तीन सफाई कामगारांचा सेप्टिक टँकमध्ये पडून गुदमरून मृत्यू झाला आहे.
माजी स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले की, एकता नगरमधील शौचालयांना झोपडपट्टय़ांनी वेढलेले आहे. त्यामुळे सेप्टिक टँक दुर्लक्षित राहिले होते. आता या सेप्टिक टँकमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. समुदाय-आधारित संस्थेच्या कोणीतरी एजन्सीला फोन करून या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यानंतर या एजन्सीने तीन मजुरांना पाठवले. त्यांनी झाकण उघडले आणि एका कामगाराने खाली वाकून तपासणी केली. त्याचदरम्यान एक कामगार टाकीत घसरला आणि त्याला मदत करण्यासाठी गेलेले अन्य दोन कामगार सुद्धा टाकीत टाकीत पडले. टाकीत पडलेल्या या तिन्ही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला.