खानापूर : खानापूर तालुक्मयाच्या दक्षिण भागात असलेल्या कापोली के. जी. येथे दर रविवारी आठवडी बाजार भरवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याकामी खानापूर तालुका भारतीय कृषक समाजाने पुढाकार घेऊन या भागातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्मयाच्या दक्षिण भागात असलेल्या कापोलीसह या भागातील जवळपास 15 ते 20 खेडय़ांना जवळची बाजारपेठ नाही. लोंढा केंवा नंदगड या ठिकाणी बाजाराला यावे लागते. त्यामुळे या भागातील लोकांची मोठी ससेहोलपट होते. दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू तसेच भाजीपाला मिळत नसल्याने या भागातील नागरिकांना कामधंदे सोडून बाजाराला यावे लागते.
यासाठी या भागातील लोकांची समस्या लक्षात घेता, कापोली के. जी. गाव मध्यवर्ती ठिकाण धरून या ठिकाणी आठवडी बाजाराला सुरुवात करण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला. यानुसार गेल्या रविवारपासून कापोली येथे आठवडी बाजार भरविण्यात सुरुवात केली आहे. या बाजाराचा शुभारंभ भारतीय कृषक समाजाचे प्रतिनिधी तसेच ग्राम पंचायत कमिटीच्या उपस्थितीत केला. दर रविवारी हा बाजार या ठिकाणी भरवला जाणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.