जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिनकरराव यादवासह जुन्या सहकाऱ्यांची आठवण
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
आपल्या कार्यकर्त्याला त्याच्या नावानिशी…. अगदी टोपण नावासह ओळखणं, त्यांना आठवणीत ठेवणे ही शरद पवार यांच्या यशस्वी राजकारणाची खुबी आहे. अनेक कार्यक्रमात स्थानिक नेते कार्यकर्त्यांना तशी हाक मारुन ते नेहमी झलक दाखवत असतात. शुक्रवारी यशवंतरावजी चव्हण यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी ही पुन्हा कोल्हापूरच्या राजकिय वर्तुळाला आणि सामान्यांना अनुभवण्यास आले. अगदी अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये `काय यादव साहेब, आज सक्काळी सक्काळीच’ या पवारांनी सांगितलेल्या किस्स्याने सर्वाना चकीत केले.
सामान्य माणसांच्या कामात नाही म्हणू नका – अधिकाऱ्यांना सल्ला व्यासपीठावरुन पूर्वाश्रमीचे सहकारी परंतु सध्या भाजपवाशी असलेले जिल्हा परिषदेतील भाजपचे गट नते अरुण इंगवले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी अशी समोर बसलेल्यांची एकामागून एक नावे घेत आपल्या स्मरणशक्तीचा परिचय करुन दिला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिनकरराव यादव यांचाही किस्सा सांगत वातावरण हलके फुलके केले. मी आमदार असताना बावड्याच्या विश्रामगृहावर त्यावेळचे जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकरराव यादव भेटायला आले. ते नजरेस पडताच शरद पवार यांनी अगदी अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये `काय यादव साहेब, आज सक्काळी सक्काळीच’ अशी साद घालतल्याचे सांगताच सर्वाना चकीत केले. दिनकरराव यादवांना नाही म्हणयाचं सवय नव्हती असे सांगत त्यांनी माकडवाला वसाहतीमधील विकास काम त्यांनी कशी मंजूर केली याची आठवण करुन दिली. 54/2 हेड कसा वापरावा हे यादव यांच्याकडूनच शिकावे, नदी पाहीजे 54/2 खाली दिली, पाणंद रस्ता पाहिजे 54/2 खाली दिला. अशी लांबलचक कामांची यादी सांगत सामन्या माणसाच्या कामासाठी यादव कसे तत्पर होते. तसेच सध्याच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनीही समान्यांच्या कामात अशी तत्परात दाखवावी अशी अपेक्षा पवार यांनी बोलून दाखवली. |
‘दो गज दुरी राहू दे तीन इंच ठेवलं तरी चालेल’ ‘आयोग्यला नाही म्हणायचं, आणि योग्य कामाला होय म्हणयचं’ ही यशवंतराव चव्हाण यांची शिकवण लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकाऱ्यांनी अधिक स्वीकारली पाहिजे, असे सांगण्यासही पवार विसरले नाहीत. तर गोकुळचे नाव घेत पवार यांनी व्यासपीठावरुन व्यासपीठासमोरील सगळ्यांचा पुकार केला. त्यामुळे साहेबांनी गोकुळच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालायचे ठरवले आहे काय अशी चर्चाही ऐकायला मिळाली. पुर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांकडे कटाक्ष टाकत कोरोना हटवायचा असेल तर `दो गज दुरी राहू दे निदान सहा इंच, तीन इंच तरी अंतर ठेवलं तरी चालेल’ असा टोला हाणला. |
कार्यकर्त्याची ओळख त्याच्याच नावाने झाली पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील पंचायत राज व्यवस्था टिकवायची असेल तर सत्तेचे केंद्रीकरण करु नका, तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यावर ठाम रहा तरच खऱ्या अर्थाने यशवंतरावांचा विचार आपण स्वीकारला असे होईल असा सल्ला देत पवार यांनी स्थानिक राजकारणात सर्वसमान्य कुटुंबातील कार्यकर्ते पुढे येण्याची गरज आहे. यशवंतराच चव्हाण जसे यशवंतराव चव्हाण म्हणूनच देशाला परिचित झाले. त्यांच्या प्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांने आपली स्वत:ची ओळख आपल्याच नावाने झाली पाहिजे असे काम करुन दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. |