प्रतिनिधी/ बेळगाव
अन्यायाने मराठी भाषिकांना म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले आहे. 60 वर्षे ओलांडली तरी हा सीमालढा अद्याप धगधगता आहे. मराठी भाषिकांचा विरोध असतानाही कानडी प्रांतात डांबण्यात आल्याने याचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात सर्व व्यवहार बंद ठेवून काळादिन आचरण्यात येतो. यावषीही काळा दिन सीमाभागात गांभीर्याने पाळला जाणार असून, तो सीमावासियांचा हक्क असल्याने प्रशासनाने त्याला परवानगी द्यावी, असा ठराव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत करण्यात आला.
रविवारी जत्तीमठ येथे युवा समितीची बैठक पार पडली. प्रारंभी समितीचे ज्ये÷ दिवंगत आमदार बी. आय. पाटील तसेच इतर कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दसऱयाची सुटी संपताच विद्यार्थी संघटना व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. काळादिन आचरण्यात आणण्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व खासदार, मुख्यमंत्री, मंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
मनपा व ग्राम पंचायतींवर भगवा फडकविणारच!
येत्या काळात मनपा व ग्रा. पं. च्या निवडणुका होणार आहेत. यामुळे राष्ट्रीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. निवडणुकांमधून सीमावासीय आपल्या लोकभावना व्यक्त करीत असतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये म. ए. समितीला यश मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महानगरपालिका तसेच ग्रा. पं. व युवकांच्या मदतीने भगवा फडकविला जाईल. यासाठी आतापासूनच रुपरेषा ठरविणे गरजेचे असल्याचे ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे, किरण हुद्दार, अभिजित मजुकर, सचिन दळवी, वासु सामजी, जोतिबा पाटील, आशिष कोचेरी, सिद्धार्थ चौगुले, मनोज पाटील, अजय सुतार यासह इतर सदस्य उपस्थित होते..