खासगीकरणाविरोधात कर्मचारी एकवटले
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगीकरणाविरोधात सर्व विद्युत कर्मचाऱयांनी सोमवारी दंडाला काळय़ा फिती बांधून आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत वीज मंडळांचे खासगीकरण करू देणार नाही. असे केंद्र सरकारने केल्यास त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा विद्युत कर्मचाऱयांनी दिला आहे.
केंद्र सरकार देशातील सर्व विद्युत मंडळांचे खासगीकरण करण्याचा विचार करीत आहे. यामुळे भावी काळात एखाद्या भांडवलशाही कंपनीकडे ही मंडळे जावून कर्मचाऱयांची पिळवणूक होणार आहे. खासगीकरण करू नये यासाठी संपूर्ण देशभरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. बेळगावमध्येही हेस्कॉम व केपीटीसीएलच्या कर्मचाऱयांनी दंडाला काळय़ा फिती बांधून आंदोलन केले.
रेल्वेस्टेशन व नेहरूनगर येथील कार्यालयासमोर सर्व लाईनमन, कार्यालयीन कर्मचारी, अधिकाऱयांनी एकत्रितपणे हे आंदोलन केले. कोरोनाच्या काळात विद्युत कर्मचाऱयांनी जीवाची बाजी लावत उत्तम सेवा दिली. हेच खासगीकरण असते तर नोकरीचा त्याग करून कर्मचारी घरी गेले असते. याचा विचार सरकारने करून हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱयांनी केले आहे.