काँगेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काश्मिरी पंडितांचे दुःख व्यक्त केले आहे. काश्मिरी पंडितांच्या एका शिष्टमंडळाची भेट भारत जोडो यात्रेदरम्यान घेतली होती. या शिष्टमंडळाने त्यांच्या दुःखद स्थितीची कल्पना करून दिली होती. दहशतवाद्यांयच टार्गेटेड किलिंगचे शिकार ठरणाऱया काश्मिरी पंडितांना सुरक्षेच्या हमीशिवाय खोऱयात जाण्यास भाग पाडणे निर्दयी पाऊल उचल्याचे राहुल यांनी या पत्रात नमूद पेले आहे.
काश्मिरी पंडितांसंबंधी योग्य निर्णय पंतप्रधान घेतील अशी आशा असल्याचेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. टार्गेटेड किलिंगमुळे काश्मीर खोऱयात भीती आणि निराशेचे वातावरण आहे. काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने काश्मीर खोऱयात कामावर परतण्यास सरकारी अधिकारी भाग पाडत असल्याचे सांगितले होते. खोऱयातील सुरक्षेच्या पूर्ण हमीशिवाय काश्मिरी पंडितांना कामावर जाण्यासाठी भाग पाडणे निर्दयी पाऊल आहे. स्थिती सुधारत नाही तोवर या कर्मचाऱयांना जनसुविधेच्या कार्यांमध्ये सामील करावे असे आवाहन राहुल यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींना केले आहे.