अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 15 मे, सकाळी 10.00
आयुर्वेदिक उपचार अन् डॉक्टरांचा सल्ला
● गटप्रवर्तक छाया गोळे, त्याचे पती सातारा तालुक्याचे कृषी अधिकारी शांताराम गोळे यांनी कोरोनाला हरवले
प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने दिलेली जबाबदारी पेलत असताना कोरोनाच्या विळख्यात सातारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शांताराम गोळे यांचे कुटुंबच साडपले होते. परंतु मनाने खंबीर होत त्यांनी व मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी छाया गोळे अन् त्यांचे चिरंजीव वेदांत गोळे अशा तिघांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर आणि वेळोवळी डॉक्टरांनी दिलेले सल्ले आचरणात आणत कोरोनाला हरवले. अन् पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या लढाईसाठी आपल्या कर्तव्यावर हजर झाले.
सातारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी शांताराम गोळे यांच्याकडे जिल्हा परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारी दिली होती. तसेच त्यांच्या पत्नी छाया गोळे या मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गटप्रवर्तक आहेत. त्या गटप्रवर्तक असल्याने कोरोना झालेल्या रुग्णांची माहिती आशा सेविकांकडून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे या कामामध्ये त्या सतत व्यस्त असतात. त्यातच त्यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात त्रास जाणवू लागला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच दि.15 एप्रिलला शांताराम गोळे यांना त्रास जाणवताच त्यांनी स्वॉब तपासणी केली. त्यात पतीपत्नी दोघे अन् मोठा मुलगा वेदांत बाधित आले. बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना तराळ यांनी दिलेल्या औषधे दिली अन् घरातच होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु केले. त्यांच्या लहान मुलीला त्यांनी दुर ठेवल्यामुळे कोरोनापासून दुर ठेवता आले. तिघांनी डॉ.योजना तराळ यांच्या सल्यानुसार औषधे घेत आयुर्वेदीक उपाय कसे करता येतील याची माहिती घेतली.
तसेच वाईच्या नायब तहसीलदार गितांजली गरड यांनीही काही औषधे सुचवली. आयुर्वेदिक औषधे पंधरा दिवस घेतल्यानंतर व तिघांनीही कोरानाला घरातून हाकलून लावले. सकारात्मक विचारसरणी गरजेची आहे.