प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शिवार जलमय झाले आहे. जोरदार पावसाने काही ठिकाणी कोवळी भात पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. तालुक्मयातील अतिवाड, कोनेवाडी, तुरमुरी, मण्णूर, आंबेवाडी, अलतगे भागात भात पिके पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
गतवषीदेखील अतिवृष्टीचा फटका शेतकऱयांना बसला होता. दरम्यान, पावसाळय़ात हजारो एकरातील पिकांना फटका बसला होता. त्यातच यंदा पहिल्याच पावसाने दणादाण उडविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्मयातील भात पेरणी अंतिम टप्प्यात आली होती. काही शेतकऱयांनी बटाटा व रताळी वेल लागवडीची कामे हाती घेतली होती. दरम्यान, मान्सूनने संततधार सुरूच ठेवल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली पेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत.
बटाटा व रताळी वेल लागवड लांबणीवर
मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बटाटा व रताळी वेल लागवड लांबणीवर पडली आहे. जोरदार पावसामुळे शिवारात पाणी साचून राहिले आहे. शिवाय पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पेरणी व लागवडीची कामे लांबणीवर पडली आहेत. भात उगवण झालेली पिके कोळपणीला आली असताना पावसाला जोर आल्याने कोळपणीची कामेदेखील थांबली आहेत.