वार्ताहर/ हुबळी
काँग्रेस पक्षाने गांधी कुटुंब व्यतिरिक्त आणखी कोणाचाच उद्धार केला नाही. काँग्रेसवर विश्वास ठेवून आम्ही मुर्ख झाल्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी सांगत आहेत. त्यांना आता आपली चूक कळाली आहे, असे मंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. रविवारी हुबळीत पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसने केलेल्या विश्वासघातामुळे कुमारस्वामींना आता पश्चाताप होत आहे. त्यांनी पहिल्यापासूनच भाजपशी हातमिळवणी केली असती तर आता त्यांना हा पश्चाताप झाला नसता, असेही ते म्हणाले. विधानपरिषद सभापतींची निवड करताना निजदने भाजपशी युती केल्यास चांगले होईल. तसेच त्यांनी पाठिंबा दिल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. बेळगाव लोकसभेची निवडणूक आपण लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ अफवा आहे. बेळगावच्या उमेदवाराबाबत अजून कोणतीच चर्चा झालेली नाही. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय वरिष्ठ नेतेचे घेतील. याबाबत मी कोणतेच वक्तव्य करणार नाही, असे मंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.