आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारच्या नविन कृषी कायद्यात काही सुधारणा भारतीय किसान संघानी सुचवलेले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त एमएसपी हा कायदा करुन लागू करण्यात यावे आणि कृषीमालाच्या विक्रेत्यांना रजिस्टर करावे. असे दोन मागण्या मान्य झाल्या नाहीत, अंशतः मान्य केलेली मागणी म्हणजे स्वंतत्र कृषी न्यायालय असे शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या मागण्यासाठी भारतीय किसान संघातर्फे येत्या आठ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभर आंदोलन एकाच वेळी एकाच दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हे आंदोलन होणार असल्याचे भारतीय किसान संघ कोल्हापूरचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले आहे.
भारतीय किसान संघ हे “बिगर राजकीय “शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवणारे शेतकरी संघटना आहे. आंदोलनाविषयी शिंदे म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हम देश का भंडार भरेंगे, लेकिन किमत पूरी लेंगें’, ‘ हम अपनी हक्क मांगते है, नही किसिसे भिख मांगते’ या धोरणानुसार हे आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदालन होणार आहे.