ऑनलाईन टीम / चंदीगढ :
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ पंजाबमधील शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन आज नवव्या दिवशीही कायम आहे. अमृतसरमध्ये किसान-मजदूर संघर्ष समितीकडून रेल्वे ट्रॅकवर जोरदार निदर्शने सुरू आहेत. 5 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.
जंडियाला गुरू या देवीदासपूर गावातील रेल्वे रुळावर बसलेल्या किसान-मजदूर संघर्ष समितीला पंजाबमधील 31 शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संघर्ष समितीचे जनरल सेक्रेटरी सरवनसिंह पंधेर म्हणाले, शिअद (बादल) यांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांच्या बरोबरीने समांतर आंदोलन सुरू केले आहे. सुखबीर बादल शिखांची मते पाहत आहेत.
त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर कॉर्पोरेट घराण्यांच्या उत्पादनांवर बंदी आणण्यासाठी गावातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पंधेर यांनी केले आहे.पंजाबमधील सर्व रागी जटा, धाडी जाटवास, कवी-लेखक तसेच पंजाब चित्रपटसृष्टीतील सर्व अभिनेते आणि गायकांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या उत्पादनांविरुद्ध सहकार्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.