प्रतिनिधी / बेळगाव
बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, काहेर विद्यापीठ यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांसाठी ‘व्हाईट कोट डे’ हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शपथ देऊन पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदिक परंपरेचे महत्त्व विषद केले. याचवेळी व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. आनंद देशपांडे यांनी विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन केले. पुरोहित मारुती भट्ट यांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली.