हरमल /वार्ताहर :
गोवा सरकारच्या जलस्त्राsत खात्यातर्फे केरी आजोबा देवस्थान ते फेरी धक्क्यापर्यतच्या भागांत उभारलेली संरक्षक भिंत वाहून गेल्याचे वाचनात आले.वास्तविक संबंधीत खात्याचे वार्षिक डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने कदाचित ही परिस्थिती उदभवली असल्याचे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले .
त्या प्रसिद्ध सुरूंच्या बनाच्या रक्षणासाठी व पर्यायाने तळवाडा व आजोबा मंदिर परिसराचे संरक्षण होण्यासाठी त्यावेळेस अंदाजे 12 कोटी व चार वर्षानंतर काही भाग वादळाच्या तडाख्यात वाहून गेल्याने 4 कोटी रुपये खर्च केले होते.प्राप्त स्थितीत सुरूंचे बन व परीसर रक्षणासाठी डागडुजी करणे काळाची गरज व अत्यावश्यक असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केले.
साधारणपणे 2008 च्या सुमारास जलसंसाधन खात्यातर्फे, मंदिर ते फेरी धक्क्यापर्यतच्या 1640 मिटरचे काम हाती घेतले होते.गवियन पद्धतीने उभारण्यात आलेल्या ह्या तटरक्षक संरक्षक भिंतीमुळे प्रसिध्द सुरूंच्या बनातील झाडांची 10- 12 वर्षानंतर पडझड थांबली होती.त्या बनातील सात-आठ, झाडांच्या रांगा अक्षरश वाहून गेल्या होत्या.त्यावेळेस गवियन पध्दतीने ऊरकलेले काम, चार वर्षात आलेल्या तुफानी वादळाने उखडून काढले व नुकसानी झाली होती.त्यामुळे 2012च्या दरम्यान, पुण्याच्या नामांकित केंद्रीय पाणी व वीज अनुसंधान केंद्र(सिडब्ल्यूपीआरसि) संस्थेच्या मार्गदर्शनांतून टेट्रापॉड संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.सदर कंपनी बंदरे व समुद्राविषयक झीज होण्याच्याबाबतीत प्रगत तंत्रज्ञान व सूचना देण्याचे कार्य करीत असते.त्यांच्या मार्गदर्शनाने,
भिंतीस टेकून, 2 टनापेक्षा जास्त वजन असलेले 5- 6 हजार सिमेंटचे टेट्रापॉड व 1.8 टन वजनाचे 3 -4 हजार सिमेंट ब्लॉक्सच्या सहाय्याने फेरीच्या बाजूने साधारण 1100 मिटरचे काम पूर्ण केले तर शिल्लक मंदिराच्या बाजूचे पूर्वीचेच गवियन पद्धतीचे काम शॅक्स व्यावसायिकांच्या आग्रहापोटी तसेच ठेवण्यात आले होते, असे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
खरे म्हणजे,वर्षभरापूर्वी मंदिराच्या बाजूचे सात- आठ मीटरचे काम खचले होते व त्याची दुरुस्ती त्याच वेळेस झाली असती तर एवढी नुकसानी झाली नसती.खात्याकडून सदर प्रकल्पाची वार्षिक डागडुजीचे काम उरकण्यास उशीर झाला.समुद्रकाठच्या, कामाची वादळ व समुद्रलाटापासून रक्षण करण्यासाठी वार्षिक डागडुजी 2- 3 वर्षांनंतर उरकणे गरजेचे असते.त्या कामात हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात संपुर्ण परिसरास धोका संभवतो असे पार्सेकर यांनी व्यक्त केले.
सध्या मंदिराच्या बाजूने गवियन पद्धतीचे काम व थोडासा टेट्रापॉड भाग रेतीस्खलन झाल्याने वाहून जाणे स्वाभाविक आहे.किनाऱयानजीकच बेसुमार रेती उपसा होत असल्याने समुद्र व नदीच्या लाटांमुळे रेती वाहून जाते, परिणामी संरक्षक भिंत धोक्मयात आली आहे.त्याची डागडुजी न केल्यास शिल्लक भाग व देवस्थान परिसर तसेच कालांतराने तळवाडा भागांत मोठय़ा प्रमाणात नुकसानी होण्याची शक्मयता असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केले.