वाळपईच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला : 4 लाखांची मालमत्ता वाचली.
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील केरी याठिकाणी घरगुती सिलेंडरला अचानकपणे आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून सतर्कता बाळगून केलेल्या कामगिरीमुळे मोठय़ा प्रमाणात अनर्थ टळला. यामुळे जवळपास चार लाखांची मालमत्ता वाचविण्यात आले असून अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून केलेल्या कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यासंदर्भात माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील केरी या ठिकाणी आज सकाळी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास घरातील सिलेंडरला अचानकपणे आग लागल्याचा प्रकार घडल्याची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला देण्यात आली .त्यानी कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन सिलेंडरवर पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात आली. सदर सिलेंडर स्वयंपाक घरात होता. अचानकपणे आग लागली. अग्निशमन दलाच्या यंत्रणेने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतल्यामुळे सिलिंडरचा स्फोट होण्यापासून वाचला. यासंदर्भात घर मालक रेहमान करोल यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वयंपाक घरात स्वयंपाकाचे काम सुरू असतानाच अचानकपणे सिलेंडरने पेट घेतला. या संदर्भात माहिती वाळपई अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मोठय़ा प्रमाणात होणारा संभाव्य अनर्थ टळल्यामुळे असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात माहिती मिळताच केरी भागातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी करून सिलेंडर विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र सिलेंडर यांच्यामधून मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्मयता असल्यामुळे जवळ जाण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. तरीसुद्धा दलाच्या यंत्रणेने अत्यंत सावधगिरी बाळगत त्याला लागलेली आग विझवण्यात केलेल्या प्रयत्न संदर्भात नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केरी भागाचे सरपंच गोविंद गावस यांनी सांगितले की सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. यदाकदाचित सदरचा स्फोट झाला असता तर घराची मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नव्हती.
या बचाव कार्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर चंद्रकांत म्हाळशेकर, तुळशीच्या झर्मेकर
सतीश देगवेकर सुनील राणे यांनी विशेष कामगिरी पार पाडली.
यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रशांत धारगळकर यांनी सांगितले की जवळपास चार लाखांची मालमत्ता वाचविण्यासाठी दलाच्या यंत्रणेला यश आलेले आहे .या घटनेतून अंदाजे अडीच हजाराच्या आसपास घरमाकाला नुकसानी झाली असली तरी सदर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात अनर्थ निर्माण झाला असता असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.