कैलास मानस सरोवर यात्रेनिमित्त रविवार दि. 2 रोजी सायंकाळी 4 वाजता विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हॉटेल न्यू उदय भवन, खानापूर रोड, टिळकवाडी येथे हा कार्यक्रम होणार असून याबाबत यात्रा संयोजक महेश शेजवाल मार्गदर्शन करणार आहेत.
कैलास मानस सरोवर हिंदू धर्मीयांचे सर्वोच्च श्रध्दास्थान. पुराणात वर्णिल्यानुसार कैलासाची परिक्रमा आपली आयुष्यभराची दुष्कर्मे नष्ट करते. आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करता यावी, अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आजपर्यंत मैत्री ग्रुपने 19 यात्रांमधून 746 यात्रेकरुंना यशस्वीरित्या ही यात्रा घडविली.
या यात्रेमुळे विश्वरुपी शक्तीची एक वेगळी ओळख होते. कैलास पर्वताचे दर्शन हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. ते सांगतात, छोटासा, पांढराशुभ्र शिवलींगरुपी दक्षिणमुखी कैलास माझ्यापासून साधारण 60 किमी. अंतरावर होता. त्याला पाहताक्षणी त्यातून असंख्य अदृश्य कंपने येत होती. माझे भान हरखून गेले. डोळय़ातून आनंदाश्रु ओघळू लागले. साष्टांग नमन करुन त्या कैलासाकडे मी बघत बसलो, मी सदेह कैलासाचे दर्शन घेत होतो. हा विचारच मनाला आनंद देत होता. एकदा यात्रा केल्यावर पुन्हा कोणी येथे जात नाही पण त्याक्षणीच मी शिवशंभोकडे प्रार्थना केली, मला अजून 11 यात्रा करण्याची शक्ती दे.’
त्या वेळी या यात्रेचं स्वरुप खडतर होतं. गेल्या 10 वर्षात अनेक सुखकर बदल झाले. वातावरण आणि स्थानिक परिस्थितीने योग्य साथ दिली तर विमान, हेलिकॉप्टर व बसच्या माध्यमातून पाचव्या दिवशीच मानस सरोवराचे दर्शन आपण घेऊ शकतो.
ब्रम्हनिर्मित सरोवराचे दर्शन व स्नान हा आयुष्यातील एक सुखद आनंद आहे. सूर्यप्रकाशाला सरोवर क्षणोक्षणी रंग बदलत असतों त्याचे मनोहारी दृश्य अनुभवण्यास मिळते. तसेच चंद्र प्रकाशात या सरोवराचे रुप म्हणजे स्वर्ग सुखच…
कैलास यात्रा कोण करु शकतो? हा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो. केवळ इच्छाशक्ती त्यानंतर योग्य मार्गदर्शन आणि नियोजन यामुळे कोणीही ही यात्रा सहजपणे करू शकतो. योग्य मार्गदर्शन आणि नियोजन यासाठी मैत्री ग्रुप्स सदैव तत्पर आहेच. मैत्री ग्रुप्समार्फत हजार यात्रेकरुंना कैलास मानस सरोवर यात्रा घडविण्याचा संकल्प आहे.
- – महेश शेजवल