रत्नागिरी
सतत बदलणाऱया वातावरणाने त्रस्त झालेल्या कोकणवासियांना आता पुन्हा अवकाळीचा दणका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, येत्या 20 एप्रिलला कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 21 ते 23 एप्रिलदरम्यान कोकणात मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
अवकाळीमुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. कारण आता सध्या काही ठिकाणी आंब्याच्या काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी आंबा बाजारात विक्रीला पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे आधीच कात्रीत सापडलेला अंाबा व्यवसाय अवकाळीच्या संकटाने पुन्हा बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. सध्या पर्यटकांची संख्या जरी कमी असली तरी थेट दुकानातून आंबा विक्री काही पर्यटक करत आहेत. तसेच अनेक ऑनलाईन कंपन्या तर काही व्यापाऱयांनी आंबा बागायतदारांशी थेट व्यवहार केल्याने आंबा व्यवसाय पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती, मात्र अवकाळीच्या इशाऱयाने ही स्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता आहे.
शहरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण
हवामान विभागाने दिलेल्या अवकाळी इशाऱयाचे प्रत्यंतर शहरवासियांना मंगळवार 19 एप्रिलला आले. कारण यादिवशी सकाळपासूनच सोसाटय़ाचा वारा वाहत होता. तसेच दिवसभर ढगाळ वातवरण होते. त्यामुळे नक्की छत्री उन्हासाठी की पावसासाठी घ्यावी, अशा संभ्रमात शहरवासीय होते.