कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे नदीकाठावरील झाडावर अडकली वानरे. कोगे गावाच्या खडक धरणाजवळील उंच झाडावरती जवळपास आठ ते नऊ वानरे झाडाच्या सभोवती पाणी आल्याने अडकून पडली आहेत. पावसाचा जोर सतत वाढत असल्याने पाणी वाढण्याचे प्रमाण जास्त सुरू आहे. गेली दोन दिवस या झाडावर अडकलेल्या वानरांना खाण्यासाठी काही मिळाले नाही. झाडाला पालवी नसल्याने ने झाडाची पाने सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीमध्ये माणुसकीचे काही युवकांनी घरातील 10 ते 12 भाकरी घेऊन झाडावरती चढण्याचा प्रयत्न केला. पण वानरे खाली येण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवितास भुकेल्या पोटी मरण्याची संभावना आहे. या या बाबीची तात्काळ वनखात्याने दखल घेऊन बोटीच्या सहाय्याने या वानरांना खाली उतरून जीवनदान देण्याची नितांत गरज आहे.
यावर्षी नैसर्गिक संकटाने फक्त मानवाला नव्हे तर सर्व प्राणी यांना पूरपरिस्थितीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. आज तर राधानगरी धरणाचे चार दरवाजे सुटल्याने पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुक्या प्राण्यांना या संकटातून बाहेर काढावे लागणार आहे. या झाडावर ती नैसर्गिक पशु आहार सुद्धा उपलब्ध नसल्याने या वानरांना खायला मिळणार कसे ? मोठ्या वानराबरोबर सुद्धा त्यांची पिल्ले आहेत. त्यांना ते जगवणार कसे ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ वानरांना या पूरपरिस्थिती मधून बाहेर काढणे अतिशय महत्वाचे आहे.