पाटबंधारे विभागाकडून वाहतूक न करण्याचे आवाहन, दैनिक तरुण भारत इफेक्ट
प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे बहिरेश्वर दरम्यान असणारे धरण वाहतुकीसाठी धोकादायक आहे. असे दैनिक तरुण भारत च्या मार्फत लाईव्ह व्हिडिओ व बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर याची तात्काळ दखल जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, करवीर पंचायत सदस्य राजेंद्र सूर्यवंशी ,सूर्यकांत दिंडे यांनी फोनद्वारे आमदार पी एन पाटील साहेब यांच्याशी संपर्क केला होता. आमदार पी एन पाटीलसाहेब यांनी पाटबंधारे विभागाची संपर्क करून 12 लाखाचा निधी तात्काळ मंजूर करून संपूर्ण धरण दुरुस्तीसाठी 45 लाखाची वाढीव निधीची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे.
पण अचानक सुरू झाल्याने नदीपात्रात पाणी जास्त वाढले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडून रोहित बांदिवडेकर साहेब यांनी या पुलावरून वाहतूक करू नये, असे पत्र कोगे व बहिरेश्वर ग्रामपंचायतला लेखी स्वरूपात दिले आहे. याची तात्काळ कारवाई म्हणून कोगे व बहिरेश्वर ग्रामपंचायतने बैठक बोलावून या पुलावरून वाहतूक करू नये, अशा आशयाची लेखी नोटीस दिली आहे. त्याच बरोबर पुलाच्या दोन्ही बाजूस हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे असा फलक लावण्यात येईल असे सांगितले आहे .दोन्ही गावातील ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेतल्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांचे कौतुक केले जात आहे.