बांधकाम अर्धवट ठेवल्याने परिसरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरण्याची शक्मयता : पावसाळय़ापूर्वी बांधकाम-स्वच्छता करण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली नाल्याची स्वच्छता करण्याची गरज आहे. मात्र यंदा नाल्याच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नाल्याचे बांधकाम अर्धवट असल्याने नाल्याचे पाणी परिसरातील घरांमध्ये शिरण्याची शक्मयता असून अर्धवट बांधकामासाठी खोदण्यात आलेली माती कोसळण्याची शक्यताही आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. नाल्याच्या भिंतीचे बांधकाम करण्यासह स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
पाऊस आला की पूरपरिस्थिती डोळय़ांसमोर दिसून येते. पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता नाल्याची स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. कोनवाळ गल्ली परिसरात नाल्यामध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याने रहिवाशांच्या घरात आणि जनावरांच्या गोठय़ात पाणी साचले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला. यंदा पावसाळय़ापूर्वी नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतेचे काम थांबविण्यात आले आहे. सध्या नाल्यात कचरा साचला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छतेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
सध्या महापालिकेच्या सर्वच अधिकाऱयांवर कोरोना पार्श्वभूमीवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाला स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. पण नाल्याची स्वच्छता व बांधकाम बंद ठेवण्यात आल्याने पावसाळय़ात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे.
नाल्याच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी शंभर कोटी अनुदानामधून निधीची तरतूद केली होती. तसेच नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ करून बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र सदर बांधकाम अर्धवट राहिले आहे. नाला बांधकाम करण्यासाठी नाल्यामध्ये रस्ता करण्यात आला आहे. तसेच भिंतीचे काँक्रिटीकरण करण्यास नाल्याच्या दुसऱया बाजूची भिंत अडचण ठरत असल्याने सुस्थितीत असलेली भिंत ठिकठिकाणी फोडण्यात आली आहे. सांडपाणी वाहण्यासाठी आणि भिंतीचे बांधकाम करण्यासाठी चरदेखील खोदण्यात आली आहे. परिणामी पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
भिंतीला तडे; कोसळण्याची भीती
कोरोनामुळे नाल्याचे बांधकाम बंद ठेवण्यात आल्याने खडी, वाळू आणि सर्व साहित्य रस्त्यावर पडून आहे. बांधकामाकरिता शाळेच्या बाजूने चर खोदण्यात आल्याने शाळा इमारतीच्या बाजूची माती कोसळत आहे. वळीव पावसामुळे नाल्यातील पाणी वाढल्याने काही ठिकाणची माती कोसळली होती. तसेच शाळेच्या सेफ्टीक टॅंकचे नुकसान झाले आहे. येथील भिंतीला तडे गेल्याने नाल्याचे पाणी वाढून माती कोसळल्यास भिंत कोसळण्याची शक्मयता आहे. यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.
याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली असता दखल घेण्यात आली नाही. नाल्याची स्वच्छता व बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने नाल्याचे पाणी येथील घरांमध्ये शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे भिंतीचे बांधकाम करण्यासह नाला स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत
आहे.