प्रतिनिधी/ नवारस्ता
मंगळवारी सलग चौथ्या दिवशी ही कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला मात्र पाणलोट क्षेत्रातून धरणात प्रतिसेकंद 33हजार 385क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याने सलग चौथ्या दिवशी धरणाचे सहा वक्र दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर ठेवण्यात आले.
दरम्यान मंगळवारी सायंकाळ पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 90.88 टीएमसी इतका झाला आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर पर्यंत 11(2924) मिलिमीटर नवजा येथे 17(3761) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 37 (3773)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 14.37 टीएमसी पाण्याची गरज आहे.