वार्ताहर /हरमल
पेडणे तालुका अपेक्षित विकास गाठू शकला नाही तरी नैसर्गिक स्थळांची श्रीमंतीत मात्र विकास झाला असल्याचे दिसून येते. गावातल्या ग्रामस्था?नी नैसर्गिक स्थळांच्याबाबतीत जातीनिशी लक्ष घालून सुरक्षित व संरक्षित केल्याने आजच्या तरुण पिढीला तो ठेवा उपलब्ध झाला आहे. सध्या कोरकणवाडा धरण अर्थात ’जलाशय पॉईंट’ एक ’इकोप्रेंडली पॉईंट’ बनले आहे.
ह्या पर्यटन स्थळी जाण्यास अवघड पायवाट असल्याने कित्येकांना डोंगर चढणे (हायकिंग) वाटत असते.देवस्थान व कार्यवाह समितीने साधारण 70-80 मीटर लांबीच्या जागेत, एक मीटर रुंदीच्या पायऱया उभारल्यास भाविक व पर्यटकांना अडथळा वाटणार नाही.आगामी जुलैमधील भंडारा उरकण्यापूर्वी चढण्या उतरण्याची सोय झाल्यास भाविकांना देव पावल्याचा साक्षात्कार होईल.
दरवषी हजारो पर्यटक ह्या स्थळाला आवर्जून भेटी देत असतात.एक नयनरम्य शांत परिसरात व कसलाही कोलाहल नसलेले स्थळ म्हणजे श्री शेणेश्वर देवांच्या प्रांगणातील, धरण,जलाशय होय.श्री देव शेणेश्वर हे एकदम जागृत व संकटसमयी हाकेला धावणारा म्हणून ओळखला जातो.एखाद्यासमयी भाविकाने श्रद्धेनिशी गाऱहाणे मांडल्यास,भाविकाला फलप्राप्ती निश्चित असल्याचा दावा आहे.गावातील अनेक जणांना त्याचा प्रत्यय असून भाविकांच्या संख्येत नित्य वाढ होत असल्याचे नागरिक आत्माराम कोरकणकर यांनी सांगितले.
पेडणे,बारदेश भागांत अनेक भक्तवत्सल मंडळी ह्या प्रांगणात येऊन दर्शन व आशिर्वाद घेत असतात. ह्या देवस्थान स्थळांचे नूतनीकरण 1995 साली माजी सरपंच प्रदीप नाईक तसेच वार्षिक भंडारा (वाडवळ)करण्यास माजी सरपंच द्वारकानाथ नाईक रामजी यांनी कायमस्वरूपी मंडप उभारला आहे.त्याच्या कार्यकर्तृवामुळे इथल्या परिसरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाचा वार्षिक भंडारा (वाडवळ)जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात असल्याचे समजते.दरवषी पाच -सहाशे लोकं त्यादिनी भंडारा उत्सवाला उपस्थिती लावीत असतात.इथल्या परिसर स्थानाला विशेष महत्व असल्याने भाविक,लोकं तितक्मयाच श्रद्धेने सामील होत असतात.
ह्या देवस्थान स्थानांचे कार्यवाह कोरकण वाडय़ावरील श्री राष्ट्रोळी देवस्थान समिति कडून होत असते.कोरोनाच्या काळात पर्यटक स्त्री पुरुष अर्धनग्न अवस्थेत फिरून व जलाशयात स्नानादी आटोपून, मद्यप्राशन वगैरे करून पवित्रता भंग केली होती.त्यावेळेस समितीने पोलिसांच्या मदतीने पर्यटकांना काबूत ठेवले होते,अशी माहिती देवस्थानचे अरुण बांधकर,संतोष कोरकणकार,आदींनी दिली.
अनुचित प्रकार टाळता येणे शक्य
यंदा जून महिन्यात ,एक केरळीयन युवक गटांगळय़ा खात असल्याचे पाहून त्यास अन्य लोकांनी त्वरित पाण्याबाहेर काढून प्रथमोपचार केले व इस्पितळात नेत असताना वाटेतच गतप्राण झाल्याची घटना घडल्याने ग्रामस्था?त चिंता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे त्या जलाशयाच्या काठावर लोखंडी जाळी गेट लावल्यास कोणीही पाण्यात उतरणे शक्मय नाही व अनुचित प्रकार टळतील,असे मत युवकांनी व्यक्त केले.सध्या ह्या जलाशयात स्नान करण्यास म्हापसा,पणजी,मडगाव सारख्या शहरांतून युवक-युवती दाखल होतात.त्यामुळे जलाशयात स्नान करण्यास बंदी घालावी अशी मागणी काही युवकांनी केली आहे.
तरी मांदे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यानी जातीनिशी लक्ष घालून व देवस्थान समितीला विश्वासात घेऊन ’इको टुरिझम’ला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्था?तून केली जात आहे.