ऑनलाईन टीम / जळगाव :
राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर केले आहे. मुंबई, पुणे नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांच्या पाठोपाठा आता अन्य शहरांमध्ये देखील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीर तेथील स्थानिक प्रशासन विविध उपाय योजनांची अंमलबाजावणी करत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 11 ते 15 मार्च या कालावधीत जळगाव शहरात जनता कर्फ्यू असणार आहे, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
ते म्हणाले, जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत 11 मार्च 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 15 मार्च 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत असून, नागिराकांनी या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
- ‘हे’ सुरू राहणार सुुरु :
जनता कर्फ्यू दरम्यान जळगाव शहर मनपा हद्दीत रेल्वे, बस, विमानसेवा, जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे. तर, टॅक्सी, कॅब, रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच, शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. याशिवाय, दुचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच, शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ (1=1), औषधी दुकाने, रूग्णालये, दूध खरेदी-विक्री केंद्र, कृषी संबंधित कामे, औद्योगिक आस्थापना, जिथं पूर्व नियोजित परिक्षा आहेत अशी शाळा, महाविद्यालये सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालयांध्ये 50 टक्के उपस्थितीस परवानगी असेल. याशिवाय बँका व वित्तीय संस्था पोस्टल सेवा आणि पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी सुरू असणार आहेत.
- ‘हे’ असणार बंद :
जनता कर्फ्यूच्या कालावधीत बंद असणाऱ्यांमध्ये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्याल, विद्यापीठ, हॉटेल, रेस्टॉरंट, (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता), किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी-विक्री केंद्रे, धार्मिक स्थळे, सलून, खासगी कार्यालये, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यामाशाळा, जलंतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री ठिकाणे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय, खासगी बांधकामे, शॉपींग मॉल्स, आठवडी बाजार इत्यादींचा समावेश आहे.
जनता कर्फ्यूच्या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या परीक्षा आयोजित करण्यात येत असल्याने या कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरिता नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्बंधातून सूट राहणार आहे. जनता कर्फ्यूचै तंतोतंत पालन होत आहे की नाही? याची जबाबदारी पोलीस विभाग व महानगरपालिक यांची संयुक्तीक राहणार, असल्याचेे सांगण्यात आले आहे.