प्रतिनिधी / नांद्रे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सवत्र हाहाकार माजवलेला आहे. नांद्रेयात सध्या 94 लोक कोरोना बाधित झाले असून 29 लोक बरे झाली आहेत, तर एकाचा मुत्यू झाला आहे. छुप्या रूग्णांची संख्या वाढतीच आहे. तरी हि लोक शासनाच्या नियमाचे पालन करीत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. या संकटाच्या कठिण परिस्थितीत जनतेला कोरोना बाबत प्रभोदन करत मदतीचा हात देण्यासाठी स्वताला जनतेचे कैवारी समझणारे पुढे येताना दिसत नाहीत. जनतेचे कैवारी हे आपआपल्या कामात मग्न आसल्याचे दिसून येत आहेत. सवच जनतेचे कैवारी अजातवासात गेल्याचे जाणवत आहे.
कोरोनाच्या या संकटात स्वताच्या खिशातून कितपत मदत केली ? हा संशोधनाचा विषय आहे. सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकांसह रूग्ण देखिल बिनधास्त बाहेर फिरत आहेत. सध्याच्या भयानक स्थितीमध्ये लोक भितीच्या वातावरणात आहेत.या भितीदायक वातावरणात लोकांना आधार व मदतीची गरज आहे. परंतु कोणताही कैवारी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे जनतेतुन गावकारभारीबद्दल नाराजी वाढत आहे. कैवारी व कारभारी प्रत्येकजण आपआपल्या कामात मग्न आहेत व जनता कोरोना व कोरोनाच्या संकटामुळे आलेले अनेक संकटामुळे चिंताग्रस्त आहेत. ही वस्तूस्थिती आहे.
अनेकांचा रोजगार बंद पडला, मोलमजरी, कामगार, शेतमजूर यांच्या हाताला काम नसल्याने घरी बसून आहेत. संचारबंदीमुळे रोजगाराची चक्रे थांबल्याने जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंटूंबाची उदरनिर्वाह कसा चालवयचा ? हा त्याच्या समोर प्रश्न आहे.या गरीब कुटूंबांना मदत करण्यासाठी संबंधीत कैवारी व कारभारी पुढे का येत नाहीत ? आसा प्रश्न जनता विचारत आहे.