ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात जमिनीच्या वार्षिक बाजार मूल्य तक्त्याचे (रेडिरेकनर) नवे दर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावरच जाहीर केले जातील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
याबाबत थोरात म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे यावषी रेडीरेकनरच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्याचा प्रस्ताव मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकानी तयार केला होता. त्यानुसार 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार होते. मात्र, देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे रेडीरेकनरच्या दरात तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतरच रेडीरेकनरचे नवे दर जाहीर केले जातील.