प्रतिनिधी/बेळगाव :
कोरोना विषाणुचा प्रसार वाढत चालल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर झाला आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने विविध प्रकारच्या आंब्याचे आगमण बाजारपेठेत झाले. तसेच सर्वांनाच घरबसल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा होत आहेत. पण लॉकडाऊनच्या बडग्यामुळे नागरिकांना आंबा खरेदी करता येत नसल्याने आंब्याचा गोडवा हरवला आहे.
गुढी पाडवा झाला की सर्वांनाच द्राक्षे, मुरटे आणि आंबे अशा जीभेचे चोचले पुरविणाऱया फळांची आठवण येते. गुढी पाडव्यानंतर बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू होते. रत्नागिरी हापुस, सिंधुदुर्ग, देवगड असा कोकणातला राजा म्हणून ओळखला जाणाऱया हापुस आंब्याचे आगमण जोरदार झाले होते. मागीलवषी पाऊस लांबल्याणे आंब्याचे आमगण फेब्रुवारी, मार्च महिन्यात झाले होते. आगमण झालेल्या काही दिवसातच कोरोना विषाणुचा फैलाव देशामध्ये सुरू झाला. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. भाजीपाल्यासह फळ मार्केटला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. बेळगाव फळ मार्केटात विविध ठिकाणाहून फळांची आवक होते. तसेच बेळगाव मार्केटमधून गोवा, हुबळी अशा विविध भागात आणि परिसरातील गावांमध्ये फळांची विक्री होते. पण कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने फळांची खरेदी कोण करणार असा मुद्दा निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेत काही किरकोळ व्यापारी फळांची खरेदी करून हातगाडीच्या माध्यमातून विक्री करीत आहेत. सध्या वाहतुक बंद असल्याने परराज्यातून येणाऱया फळांची आवक कमी झाली आहे. तर कोकणातून आंबा आणण्यासाठी शासनाकडून परवानगी घ्यावी लागत आहे. पण ही परवानगी राज्यांतर्गत असल्याने दोन राज्याच्या सीमेवर एका वाहनातून दुसऱया वाहनामध्ये आंबे घालून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे आंब्याचे दर एरवीप्रमाणेच स्थिर आहेत. सध्या फळ बाजारपेठेत हापुस आंब्याचा दर 800 रूपये डझन पासून 400 रूपये पर्यंत आहे. तसेच लहान आणि मोठय़ा आकाराच्या आंब्याचा दर मागणीनुसार आहे. तसेच संत्री, सफरचंद, द्राक्षे आदी फळांची आवक घटली आहे. हिमाचलप्रदेश मधून येणारा सफरचंद बंद झाला आहे. शीतगृहात असलेला साठा विक्रीसाठी काढण्यात येत आहे. त्यामुळे सफरचंदचा दर 150 रूपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे संत्र्याचा दर प्रति 20 किलो पेटीला 600 ते 700 रूपये बाजारपेठेत आहे. द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने आवक घटली आहे. तरी देखील फळ बाजारपेठेत 250 ते 300 दहा किलो दराने द्राक्षाची विक्री होत आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, मागणी देखील वाढत आहे. आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. पण बाजारपेठ बंद असल्याने आणि संचारबंदी असल्याने नागरिकांना आंबे मिळणे कठिण बनले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे आंब्याचा गोडवा हरवला आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक असली तरी उचल म्हणावी तशी होत नाही. त्यामुळे फळ विपेत्यांसह बागायतदार, फळ उत्पादकांना कोरोनाचा फटका बसला आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात आर्थिक हानी सोसावी लागत आहे. फळे घेण्यासाठी नागरिकांना जादाचे पैसे देखील मोजावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.