ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या संकटामुळे देशातील टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. याबाबत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कोणत्याही टोल नाक्मयावर टोलवसुली होणार नाही. अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांना विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रस्त्याची देखभाल व आपत्कालीन सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.