पालकमंत्र्यांनी सुनावले प्रशासनाला खडेबोल : वस्तू वाटून फोटो व्हायरल करू नका
प्रतिनिधी / वैभववाडी:
नगरपंचायतींना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन लाख रु. चा निधी शासनाकडून देण्यात येत आहे. जिह्यातील सर्व नगरपंचायतींना हा निधी मिळाला आहे. यासाठी आपण प्रस्ताव का पाठवला नाही? प्रशासकीय अधिकाऱयांनी असा हलगर्जीपणा करू नका. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी एकत्र बसून नियोजन करून जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने खबरदारीची उपाययोजना करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. लोकांना वस्तू वाटताना त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करू नका, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी तहसीलदार कार्यालयात अधिकाऱयांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, तहसीलदार रामदास झळके, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील, मुख्याधिकारी सुरज कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी उपस्थित होते. तालुक्मयात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबत सक्रिय नाही. त्यामुळे चोरटी वाहतूक होते. वारंवार सांगूनही रस्ते बंद केले जात नसतील, तर संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री सामंत यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांशी सामंत यांनी फोन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना भेटून त्वरीत कारवाई करा व काय केले याची मला माहिती द्या, अशा सूचना दिल्या.
एकही रुग्ण विलगीकरण कक्षात नाही
तालुक्मयात 116 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना 28 दिवस ठेवण्यात आले आहे. तर परदेशातून चार लोक आलेले आहेत. या सर्वांवर आरोग्य कर्मचाऱयांमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या तालुक्मयात एकही रुग्ण विलगीकरण कक्षात नाही, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील यांनी दिली.
एन-95, पीपीई किटची मागणी
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱयांना एन-95 व पीपीई किट उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी केली. पालकमंत्री सामंत यांनी लगेच दूरध्वनीवरून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून उपलब्ध करून देणेबाबत सूचना केली. वैभववाडी येथील शिवभोजन थाळी 50 वरून 100 करण्याची सूचना सामंत यांनी केली.
गैरवर्तणुक करणाऱयांवर कडक कारवाई करा
सिंधुदुर्ग हा शिस्तप्रिय जिल्हा आहे. येथील 99 टक्के जनता शासनाच्या आदेशाचे पालन करतात. मात्र, एक टक्के लोक अशा आदेशाची पायमल्ली करीत आहेत. या एक टक्के लोकांच्या गैरवर्तणुकीचा फटका इतरांना बसत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी दिले.