कोरोनाच्या आजारपणात बहुतांश रुग्णांत संसर्ग पसरल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर त्याची लक्षणे दिसू लागतात. सामान्यतः चौदा दिवसांनी रुग्ण बरा होतो. पण यासाठी पाचवा आणि दहावा दिवस महत्त्वाचा आहे.
- संसर्गाचा पहिला भाग हा व्हायरल रिऍक्शनचा असतो आणि त्यानंतर बहुतांश लोक ताप आणि अशक्तपणाचा अनुभव घेतात. यादरम्यान शरिरातील इम्यून सिस्टिम हे दुसर्या टप्प्यात काम करण्यास सुरवात करते. इम्यून सिस्टिम हे संसर्गाला रोखण्यासाठी अँटीबॉडीची निर्मिती करते.
- या संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णात असलेल्या लक्षणांवर अवलंबून आहे. कोविडपासून रिकव्हरी ही पूर्णपणे पाच दिवसांच्या लक्षणांवर अवलंबून आहे.
- सुरवातीच्या काळात रुग्णांत लक्षणे दिसत नाहीत किंवा किरकोळ लक्षणे दिसू लागतात. पण पाचव्या दिवसांनंतर रुग्णात गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे संसर्गाच्या गांभीर्याचे आकलन होते.
- पाचव्या दिवसांपासून लक्षणे ही दुसर्या टप्प्यात प्रवेश करतात. यात इम्यूनिटी सिस्टिम ही संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करते.
- या काळात रुग्णाला तब्येतीत चढउतार पाहवयास मिळतात. ऑक्सिजनची पातळी घसरणे, ताप वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा आदी. त्यामुळे ठराविक काळानंतर त्याच्यावर देखरेख करणे गरजेचे आहे.
- संसर्ग आणि रिकव्हरीत रुग्णाचे वय हे खूप महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा, हाय कॉलेस्ट्रॉल, मधुमेह, इम्युनो-कॉम्प्रोमायजिंग स्थितीने पिडीत रुग्णांना अधिक धोका राहू शकतो. युवा मंडळी आजारी पडल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू शकते. त्यांनीही सजग राहणे आवश्यक आहे.
- कोरोनाबाधित रुग्णांतील लक्षणे पूर्णपणे निघून जाण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर तो बरा होऊ लागतो. सात ते दहा दिवसात तो बरा होतो आणि त्यानंतर किरकोळ लक्षणे असतात. तेव्हा तर घरातच आयसोलेट राहून बरा होतो.
- दुसरीकडे गंभीर रुग्णाला पाचव्यापासून ते दहा दिवसांपर्यंत तीव्र लक्षणांचा सामना करावा लागतो. या काळात तो आजारपणाच्या सुरवातीचा काळ आणि आताच काळ यात फरक ओळखतो. अनेक रुग्णांत लक्षणे कमी झाल्यानंतर ते स्वतःला बरे समजतात. परंतु काही दिवसानंतर त्यांच्यात पुन्हा लक्षणाची दुसरी लाट त्रास देऊ शकते.
- गंभीर संसर्ग असेल तर सात दिवसांनंतर अडचणी,कोरोनाच्या गंभीर रुग्णांत अंगदुखी, थकवा, खोकला यासारखी लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात.
- अशा वेळी रुग्णात श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशा रुग्णांत भ्रामक स्थिती निर्माण होते. बेशुद्ध पडण्यासारखी मानसिक अवस्थेला देखील काही वेळा त्याला सामोरे जावे लागते